बुधवार, 24 अगस्त 2011

पवनार

 पवनार  हे  गाव वर्धा- नागपूर या महामार्गावर असून, ते वर्ध्यापासून सुमारे सहा कि.मी. अंतरावर आहे. येथील धाम नदीच्या काठावर स्व. विनोबा भावे यांचा आश्रम असून, यालाच परमधाम आश्रम म्हणतात. स्व. विनोबाजी भावे यांचा जन्म 10 सप्टेंबर 1985 साली रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावात झाला.
त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण बडोदा (गुजराथ) येथे झाले. नंतर हिंदु विद्यापीठात संस्कृत अध्ययन केले. तेथेच त्यांनी गांधीजींचे भाषण ऐकले व गुरु-शिष्टयांचा पत्रव्यवहार सुरु झाला.
त्यांनी वयाच्या 55 ते 68 पर्यात भू दान पदयात्रा केली. तत्पुर्वी आंध्र प्रदेशातील रामचंद्र रेड्‌डी या जमीनदाराने 100 एकराचे भुमीदान केले. जगाच्या इतिहासात पहिला क्षण असा होता की रक्ताचा एकही थेब न सांडता हजारो एकराचे भूदान मिळाले. या पदयात्रेनंतर 1970 साली विश्रांतीसाठी वर्धा जवळील पवनार येथील परमधाम आश्रमात परतले. गोपुरी येथे विनोबाजी भावे बरेच दिवस वास्तव्याला होते. त्यावेळी स्व. जमनालालजी तेथे एक कुटी बांधून राहत असत. तेथे आता गीताई मंदिर बांधण्यात आले आहे.  गीतेचे अठरा अध्याय विविध प्रकारच्या शीळावरुन कोरुन त्याचे स्तंभ उभे केले आहे. या मंदिराला छत नाही, मंदीराच्या भिंतीचा आकार दुरुन चरखा व गाईचा आभास निर्माण करणारा दिसतो.
विनोबांची गिताई येथे अमर झाली आहे.  या काळात गिताई, गिताप्रवचने असंख्य स्फुटविचार मागे ठेवून परावाणीने `रामहरी ` म्हणत 15 नोव्हेंबर 1982 मध्ये अनंतात विलीन झाले. धामनदीत आचार्य विनोबा भावे यांच्या पार्थिव शरीराला अग्नि देण्यात आला होता. यावेळी शासनातर्फे एक स्मारक बांधण्यात आले आहे. स्व. विनोबाजी भावे यांच्या पवनार आश्रमाला देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, देशातील नामवंत लोकांनी भेटी दिल्या असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील सदस्य या ठिकाणाला भेटी दिल्या. तसेच या ठिकाणाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित झाल्याने अनेक देश विदेशातील पर्यटक व शैक्षणिक सहली या ठिकाणी येऊन प्रेरणा घेतात. पवनार आश्रम येथे कुसुमताई देशपांडे व गौतम बजाज यांचे कायम वास्तव्य आहे.  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें